Natepute Express
मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग
मुख्य बातमी 1/3

मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग

संत नगरी मंगळवेढा शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित असणारे सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ होय. या मंडळाची स्थापना सन 1968 मध्ये झाली. मंडळाचे एकोणसाठावे वर्ष आहे, त्यावेळेचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै गौरीशंकर वठारे हे होते, सदर मंडळाचे समितीमध्ये स्वर्गीय बंडा मोडक, दामोदर दत्तू, चंद्रकांत किल्लेदार, निवृत्ती डोरले, सुकदेव जावळे, रामचंद्र चेळेकर, भाऊ चेळेकर, धोंडीराम राऊत, डॉ. बी. पी. देशमुख, बाबू लेंडवे, चंद्रकांत वेदपाठक पेंटर, लक्ष्मण चेळेकर, राजेंद्र भगरे हे होते व मंडळाचे मार्गदर्शक म्हणून आण्णाराव चेळेकर होते. यातील अनेक जण हयात नाहीत मात्र त्यांचे विचार व प्रेरणा घेऊन हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने स्थापनेपासून अंदाजे तीन ते चार वेळा रक्तदान शिबिर घेतले होते, यामध्ये जवळपास 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ
मुख्य बातमी 2/3

झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी 11 दिवस शेतात राहिल्याने हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावून घेतला. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनीच्या पाण्याने सिना नदी भरली असली तरी शेतीला पुरेशी वीजच मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळू लागल्याने दर आठवड्याला एक एकर ऊस सोडून देण्याची वेळ आल्याची व्यथा सीनाकाठी असलेल्या खैराव येथील शेतकरी कृष्णात गोवर्धन नागटिळक यांनी मांडली. माढा तालुक्यातील खैराव येथील शेतकरी असलेल्या नागटिळक यांना 18 एकर जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी सीना नदीला महापूर आल्याने अकरा दिवस पुराचे पाणी शेतात राहिले. यंदा झालेल्या नुकसानीची कसर निघेल या भाबड्या आशेने एकरी 40 हजार रुपये खर्च करून ऑक्टोबर महिन्यात 9 एकर ऊस, 4 एकर वैरण आणि दोन एकर कडवळाची लागवड केली. त्यासाठी 5 लाखांवर खर्च केला. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली.

दुष्काळ-पंचनाम्यांवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
मुख्य बातमी 3/3

दुष्काळ-पंचनाम्यांवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

"राज्यात पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके हातातून गेली तरी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, धान्याची गोदामे भरलेली आहेत, पण पाणी कुठून आणायचे हा खरा मोठा प्रश्न आहे. अशा गंभीर संकटाच्या काळात राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात स्वतः घराबाहेर न पडता काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे," असा जोरदार टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी राज्यातील पावसाची तूट, दुष्काळी पंचनाम्यांवरून सुरू असलेला राजकीय वाद, शरद पवारांचे पत्र, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरील विधाने आणि राहुल गांधी यांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. गणरायाला पावसाचे साकडे; धान्य मिळेल, पण पाणी कुठून आणणार? राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणाले, "यंदा पावसाने सुरुवातीला महिनाभर ओढ दिली आणि आता पुन्हा 35 ते 40 दिवस पावसाचा खंड पडला आहे.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (5.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
सोलापूर जिल्हा

मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग

संत नगरी मंगळवेढा शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित असणारे सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ होय. या मंडळाची स्थापना सन 1968 मध्ये झाली. मंडळाचे एकोणसाठावे वर्ष आहे, त्यावेळेचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै गौरीशंकर वठारे हे होते, सदर मंडळाचे समितीमध्ये स्वर्गीय बंडा मोडक, दामोदर दत्तू, चंद्रकांत किल्लेदार, निवृत्ती डोरले, सुकदेव जावळे, रामचंद्र चेळेकर, भाऊ चेळेकर, धोंडीराम राऊत, डॉ. बी. पी. देशमुख, बाबू लेंडवे, चंद्रकांत वेदपाठक पेंटर, लक्ष्मण चेळेकर, राजेंद्र भगरे हे होते व मंडळाचे मार्गदर्शक म्हणून आण्णाराव चेळेकर होते. यातील अनेक जण हयात नाहीत मात्र त्यांचे विचार व प्रेरणा घेऊन हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने स्थापनेपासून अंदाजे तीन ते चार वेळा रक्तदान शिबिर घेतले होते, यामध्ये जवळपास 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

सोलापूर जिल्हा

झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी 11 दिवस शेतात राहिल्याने हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावून घेतला. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनीच्या पाण्याने सिना नदी भरली असली तरी शेतीला पुरेशी वीजच मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळू लागल्याने दर आठवड्याला एक एकर ऊस सोडून देण्याची वेळ आल्याची व्यथा सीनाकाठी असलेल्या खैराव येथील शेतकरी कृष्णात गोवर्धन नागटिळक यांनी मांडली. माढा तालुक्यातील खैराव येथील शेतकरी असलेल्या नागटिळक यांना 18 एकर जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी सीना नदीला महापूर आल्याने अकरा दिवस पुराचे पाणी शेतात राहिले. यंदा झालेल्या नुकसानीची कसर निघेल या भाबड्या आशेने एकरी 40 हजार रुपये खर्च करून ऑक्टोबर महिन्यात 9 एकर ऊस, 4 एकर वैरण आणि दोन एकर कडवळाची लागवड केली. त्यासाठी 5 लाखांवर खर्च केला. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली.

महाराष्ट्र

दुष्काळ-पंचनाम्यांवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

"राज्यात पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके हातातून गेली तरी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, धान्याची गोदामे भरलेली आहेत, पण पाणी कुठून आणायचे हा खरा मोठा प्रश्न आहे. अशा गंभीर संकटाच्या काळात राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात स्वतः घराबाहेर न पडता काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे," असा जोरदार टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी राज्यातील पावसाची तूट, दुष्काळी पंचनाम्यांवरून सुरू असलेला राजकीय वाद, शरद पवारांचे पत्र, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरील विधाने आणि राहुल गांधी यांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. गणरायाला पावसाचे साकडे; धान्य मिळेल, पण पाणी कुठून आणणार? राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणाले, "यंदा पावसाने सुरुवातीला महिनाभर ओढ दिली आणि आता पुन्हा 35 ते 40 दिवस पावसाचा खंड पडला आहे.

महाराष्ट्र

जुने पूल पाडणार, नवा 'अखंड' उड्डाणपूल उभारणार

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा बदल घडवून आणणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे. शेंद्रा येथून सुरू होऊन बजाजनगरमधील ओएसिस चौकाच्या पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर आता त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र

कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी

"दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे," असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिशा सालियन मानहानी प्रकरणातील नोटीस, मंत्री नितेश राणे यांच्या विधानांवरून कणकवलीतील जुन्या गुन्ह्यांचा पाढा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा बेमुर्वतखोरपणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे 'सूर्यास्ता'चे वक्तव्य आणि यूपीआय शुल्कावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.

सोलापूर जिल्हा

टेंभुर्णीत जीपखाली तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न

एका तरुणाला थार गाडी अंगावरुन घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या कारणावरुन टेंभुर्णी(ता. माढा) येथील झिरपे वस्तीवर दोन गट आमने सामने आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून या गटात दोनदा हाणामारी झाली. एक चारचाकी तसेच 3 दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार दाखल नाही. पोलिसांकडून तक्रार दाखल करत पारस हवालदार,आप्पा आटकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख,समाधान देशमुख, प्रतीक बंडू पाटील (रा. सर्व टेंभुर्णी ता. माढा) या बारा जणांविरोधात कलम 324(5),194 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झिरपे वस्तीवर हवालदार आणि देशमुख गटात हाणामारी झाली होती.यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले होते.याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित लोकं आले असता गावातील पुढारी व कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करून वाद मिठवला होता. परंतु 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा