Natepute Express
टेंभुर्णीत जीपखाली तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न
मुख्य बातमी 1/3

टेंभुर्णीत जीपखाली तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न

एका तरुणाला थार गाडी अंगावरुन घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या कारणावरुन टेंभुर्णी(ता. माढा) येथील झिरपे वस्तीवर दोन गट आमने सामने आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून या गटात दोनदा हाणामारी झाली. एक चारचाकी तसेच 3 दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार दाखल नाही. पोलिसांकडून तक्रार दाखल करत पारस हवालदार,आप्पा आटकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख,समाधान देशमुख, प्रतीक बंडू पाटील (रा. सर्व टेंभुर्णी ता. माढा) या बारा जणांविरोधात कलम 324(5),194 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झिरपे वस्तीवर हवालदार आणि देशमुख गटात हाणामारी झाली होती.यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले होते.याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित लोकं आले असता गावातील पुढारी व कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करून वाद मिठवला होता. परंतु 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच

गावामध्ये झाडे लावाल तरच पाऊस येणार
मुख्य बातमी 2/3

गावामध्ये झाडे लावाल तरच पाऊस येणार

गावात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्या, झाडे लावलात तरच पाऊस येणार आहे. नाही तर दुष्काळासारख्या कठीण परस्थिती सामोरे जावे लागणार असल्याचे मत पाटोदाचे आदर्श सरपंच संकल्पनेचे प्रणेते भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गणेशोत्सवानिमित्त आदर्श गाव संकल्पनेवर प्रेरणादायी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. करजगीचे सरपंच विवेकानंद उंबरजे आणि दयानंद उंबरजे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. आपल्या व्याख्यानात पेरे-पाटील यांनीआदर्श गावाची संकल्पना, ग्रामविकासातील ग्रामस्थांची भूमिका, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

चला जाणुया नदीला:जलक्रांती...भीमा, सीना, माण, आदिलासह 7 नद्या खळाळणार
मुख्य बातमी 3/3

चला जाणुया नदीला:जलक्रांती...भीमा, सीना, माण, आदिलासह 7 नद्या खळाळणार

"चला जाणूया नदीला "या अभियानात राज्यातील 108 नद्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, दुबधुबी, आदिला, माणगंगा, कासाळगंगा, कोरडा आदी नद्यांचा समावेश केलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच यासंदर्भात बैठक झाली. नदी पुनर्जिवित करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबत मंत्री महाजन यांनी सूतोवाच केल्याने जिल्ह्यातील जलदूत, जलमित्र यांच्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नद्या पुनरुज्जीवित करून वाहत्या झाल्याशिवाय पुढच्या पिढ्यांना जगता येणार नाही, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी जलदूत, जलमित्र यांच्या माध्यमातून राज्यातील 108 नद्यांची निवड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "चला जाणूया नदीला " या अभियानाचा शुभारंभ सन 2022 साली वर्धा येथे केला होता. तेव्हापासून विविध उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर लोक सहभागातून नद्यांची ओळख करून देण्याचे काम जलदूत व जलमित्र करत होते. या बैठकीत डॉ. राजेंद्रसिंह, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकासचे प्रधान सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, लाभ क्षेत

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (5.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
सोलापूर जिल्हा

टेंभुर्णीत जीपखाली तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न

एका तरुणाला थार गाडी अंगावरुन घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या कारणावरुन टेंभुर्णी(ता. माढा) येथील झिरपे वस्तीवर दोन गट आमने सामने आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून या गटात दोनदा हाणामारी झाली. एक चारचाकी तसेच 3 दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार दाखल नाही. पोलिसांकडून तक्रार दाखल करत पारस हवालदार,आप्पा आटकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख,समाधान देशमुख, प्रतीक बंडू पाटील (रा. सर्व टेंभुर्णी ता. माढा) या बारा जणांविरोधात कलम 324(5),194 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झिरपे वस्तीवर हवालदार आणि देशमुख गटात हाणामारी झाली होती.यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले होते.याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित लोकं आले असता गावातील पुढारी व कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करून वाद मिठवला होता. परंतु 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच

सोलापूर जिल्हा

गावामध्ये झाडे लावाल तरच पाऊस येणार

गावात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्या, झाडे लावलात तरच पाऊस येणार आहे. नाही तर दुष्काळासारख्या कठीण परस्थिती सामोरे जावे लागणार असल्याचे मत पाटोदाचे आदर्श सरपंच संकल्पनेचे प्रणेते भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गणेशोत्सवानिमित्त आदर्श गाव संकल्पनेवर प्रेरणादायी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. करजगीचे सरपंच विवेकानंद उंबरजे आणि दयानंद उंबरजे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. आपल्या व्याख्यानात पेरे-पाटील यांनीआदर्श गावाची संकल्पना, ग्रामविकासातील ग्रामस्थांची भूमिका, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

सोलापूर जिल्हा

चला जाणुया नदीला:जलक्रांती...भीमा, सीना, माण, आदिलासह 7 नद्या खळाळणार

"चला जाणूया नदीला "या अभियानात राज्यातील 108 नद्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, दुबधुबी, आदिला, माणगंगा, कासाळगंगा, कोरडा आदी नद्यांचा समावेश केलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच यासंदर्भात बैठक झाली. नदी पुनर्जिवित करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबत मंत्री महाजन यांनी सूतोवाच केल्याने जिल्ह्यातील जलदूत, जलमित्र यांच्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नद्या पुनरुज्जीवित करून वाहत्या झाल्याशिवाय पुढच्या पिढ्यांना जगता येणार नाही, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी जलदूत, जलमित्र यांच्या माध्यमातून राज्यातील 108 नद्यांची निवड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "चला जाणूया नदीला " या अभियानाचा शुभारंभ सन 2022 साली वर्धा येथे केला होता. तेव्हापासून विविध उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर लोक सहभागातून नद्यांची ओळख करून देण्याचे काम जलदूत व जलमित्र करत होते. या बैठकीत डॉ. राजेंद्रसिंह, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकासचे प्रधान सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, लाभ क्षेत

सोलापूर जिल्हा

पाण्यासाठी तुळशी ग्रामस्थांचा थाळीनाद

माढा गेल्या पंचवीस वर्षांपासून अनेक आंदोलने करूनही सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तुळशी गावकऱ्यांनी "आमचे गाव विक्रीस काढले आहे, कोणीतरी विकत घ्या" अशी आर्त हाक देत उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन केले. सन 2000 पासून सिना-माढा उपसा जलसिंचन योजना कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून तुळशी गावाचा या योजनेत समावेश नव्हता. अनेक निवेदने व आंदोलनानंतर गावाचा समावेश झाला, मात्र समावेश होऊनही अद्याप पाणी आलेले नाही. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे गंभीर हाल होत आहेत.

महाराष्ट्र

सत्तेच्या स्थैर्यासाठीच दिवे लावण्याचं फर्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या निमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळेच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींना ऊर्जा मिळण्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. पण दिवे लावा, काहीही करा... ग्रह कधीच रजेवर जात नाहीत!", असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमांवरून राऊतांचा सवाल संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपच्या आध्यात्मिक कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोलापूर जिल्हा

बनावट बँक खाती उघडून फसवणूक, नातेपुतेत 6जण गजाआड

नातेपुते - रेशन कार्डचे ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणे बंद होईल, अशी खोटी भीती दाखवून तब्बल 300 हून अधिक नागरिकांचे आधारकार्ड, बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन आणि फेस ऑथेंटिकेशनचा गैरवापर करून बनावट सिमकार्ड आणि बँक खाती उघडणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या धडक कारवाईत लॅपटॉप आणि मोबाईलसह सुमारे 12 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा नातेपुते पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नातेपुते पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील 300 हून अधिक नागरिकांची ई-केवायसीच्या नावाखाली माहिती घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक तसेच फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमकार्ड काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा